राज्यातील आठ लाख प्रौढ परीक्षेला बसणार असे असणार पेपर चे स्वरूप नवभारत साक्षरता कार्यक्रम ullas navbharat literacy program 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्यातील आठ लाख प्रौढ परीक्षेला बसणार असे असणार पेपर चे स्वरूप नवभारत साक्षरता कार्यक्रम ullas navbharat literacy program 

यवतमाळ वार्ताहर – दहावी-बारावीच्या परीक्षेतून नातवंडे मोकळी होताच आता घरातील निरक्षर आजी-आजोबांची परीक्षा होणार आहे. नव भारत साक्षरता कार्यक्रमातून शिक्षणाचे धडे गिरविणाऱ्या या प्रौढांची येत्या रविवारी (ता. 23-03-2025) प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा घेतली जाणार आहे.

Table of Contents

राज्यातून तब्बल आठ लाख प्रौढ या परीक्षेला बसणार आहेत.

केंद्र पुरस्कृत नव भारत साक्षरता कार्यक्रमात गेल्या वर्षभरापासून असाक्षरांची नांदणी आणि त्यांचा अभ्यासवर्ग सुरू आहे. आता त्यांची परीक्षा घेऊन त्यांना साक्षर झाल्याचे प्रमाणपत्र मिळणार आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी 17 मार्च रोजी झालेल्या या परीक्षेतून सुमारे पाच लाख प्रौढांनी ‘साक्षर होण्याचा’ आनंद मिळविला आहे.

आता आणखी आठ लाख आजी-आजोबांना ही संधी चालून आली आहे. राज्यात हा कार्यक्रम योजना शिक्षण संचालनालयामार्फत राबविला जात आहे. शिक्षण संचालक (योजना) डॉ. महेश पालकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, असाक्षर प्रौढांनी ज्या शाळेतून नोंदणी केली, ती शाळाच त्यांचे परीक्षा केंद्र राहणार आहे.

इतक्या गुणांचा असेल पेपर

दीडशे गुणांच्या या परीक्षेत वाचन, लेखन आणि संख्याज्ञान या घटकांवर प्रत्येकी 50 गुणांचे प्रश्न असतील. उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक घटकात 33 टक्के म्हणजे किमान 17 गुण आजी-आजोबांना मिळवावे लागणार आहेत. तर परीक्षकांना पाच वाढीव गुण देण्याची तरतूद आहे. विशेष म्हणजे, सकाळी 10 ते

सायंकाळी 5 या वेळेत प्रौढांना आपल्या सोयीनुसार कधीही शाळेत जाऊन दीड तासात पेपर सोडवता येणार आहे. दिव्यांगांना 30 मिनिटे जादा मिळणार आहेत.

असे आहेत राज्यातील परीक्षार्थी

– मागील वर्षी नोंदणी करूनही परीक्षा न देणारे : 2,03,130

– मागील वर्षी ‘सुधारणा आवश्यक’ शेरा मिळालेले : 33,627

– यावर्षी उल्लास अॅपवर नोंदणी झालेले: 5,58,392

– राज्यातील एकूण परीक्षार्थी प्रौढ : 8,04,099

2024-25 या सत्रात नोंदणी झालेल्या असाक्षरांबरोबरच मागील वर्षी ज्यांना ‘सुधारणा आवश्यक’ असा शेरा मिळाला होता, त्यांनाही यंदा परीक्षेला बसायचे आहे. तसेच मागील वर्षी नोंदणी करूनही ज्यांनी परीक्षा दिली नाही, त्यांनाही यंदा परीक्षा बसायचे आहे.

– डॉ. महेश पालकर, शिक्षण संचालक (योजना)

– राजेश क्षीरसागर, राज्य समन्वयक, नव भारत साक्षरता

कार्यक्रम

कोणत्या जिल्ह्यात किती प्रौढ देणार परीक्षा?

जिल्हा : परीक्षार्थी

विदर्भ –

अमरावती : 14758

नागपूर : 23325

अकोला : 13223

यवतमाळ : 17122

वर्धा : 9439

गडचिरोली : 31707

चंद्रपूर : 23515

वाशिम : 18972

भंडारा : 7030

बुलडाणा : 14211

गोंदिया : 7889

पश्चिम महाराष्ट्र –

पुणे : 41944

सांगली : 15895

सोलापूर : 35250

सातारा : 18050

कोल्हापूर : 24292

मराठवाडा –

परभणी : 20374

बिड : 21281

हिंगोली : 10428

लातूर : 19272

नांदेड : 28629

जालना : 21162

धाराशिव : 15237

छत्रपती संभाजीनगर : 26921

उत्तर महाराष्ट्र –

धुळे : 17532

अहमदनगर : 34624

नाशिक : 40007

नंदूरबार : 31503

जळगाव : 50849

कोकण –

सिंधुदुर्ग : 4496

रत्नागिरी : 12094

ठाणे : 33237

पालघर : 33691

रायगड : 15329

मुंबई उपनगर : 35684

मुंबई : 15127

 

Join Now