नाशिक शहर व परिसरातील पर्यटन स्थळे tourists point place in nashik city and district
काळाराम मंदीर
काळाराम मंदीर सरदार रंगराव ओढेकर यांनी सन 1782 मध्ये जुन्या लाकडी मंदिराच्या जागेवर बांधले. प्रभु रामचंद्र आपल्या वनवासा दरम्यान ज्या जागी राहिले त्या ठिकाणी हे मंदीर होते, असे मानले जाते. सदर मंदीराचे बांधकामासाठी 2000 कारागिर 12 वर्ष राबत होते. पश्चिम भारतातील प्रभु रामचंद्राच्या सुंदर मंदिरांपैकी एक असे हे मंदीर आहे. 245 फुट लांब व 145 फुट रुंद मंदिर परिसराला 17 फुट उच दगडाची भिंत आहे. मंदिरासाठी सर्व बाजुंनी मोकळा असलेला स्वतंत्र सभामंडप आहे. मंदिरात प्रभू रामचंद्र, सिता, लक्ष्मण यांच्या काळया पाषाणातील 2 फुट उंचीच्या मुर्त्या आहेत. चैत्र महिन्यात येथे रामनवमीचा उत्सव आयोजित करण्यात येतो.
श्री त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिर
श्री त्रयंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिर नाशिक पासुन 28 कि.मी. अंतरावर स्थित आहे. गोदावरी नदीचे उगम स्थान असलेल्या ब्रम्हगिरी पर्वताच्या पायथ्याशी त्रयंबकेश्वर वसलेले आहे.
सध्याचे मंदिर तिसरे पेशवे बाळाजी बाजीराव (सन 1740 ते 1760) यांनी जुन्या मंदिराच्या जागेवर बांधले आहे. त्रयंबकेश्वर मंदिराचे व्यवस्थापन हे त्रयंबकेश्वर मंदिर हे ट्रस्टकडुन केले जाते. ट्रस्टकडुन भक्तांसाठी निवासाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
कुशावर्त तिर्थ
कुशावर्त तिर्थ हे त्र्यंबकेश्वर शहराच्या मध्यभागी श्री त्र्यंबकेवर ज्योतिर्लिंग मंदिरा पासुन अदमासे 300 मी. अंतरावर स्थित आहे. कुशावर्त तिर्थ हे 21 फुट खोलीचे नैसर्गिक पाण्याचे झरे असलेले कुंड सन 1750 मध्ये बांधण्यात आले. गोदावरी नदी ब्रम्हगिरी पर्वतावरुन लुप्त झाल्यांनतर हया ठिकाणी प्रकट होते अशी काही लोकांची श्रध्दा आहे. या कुशावर्तात आधी स्नान करुन मग त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनार्थ जाण्याची परंपरा भाविक पाळतात. कुशावर्तात खाली जिवंत पाण्याचे झरे आहेत व गोदावरीच्या उगमस्थानापासुन नंतरच्या नदीप्रवाह कुशावर्तात येऊन पुढे वळण घेतो. कुशावर्त परिसरातही काही छोटी मंदिरे आहेत. या तीर्थकुंडाच बांधकाम इ.स. १७५० मध्ये झाले आहे. आत उतरण्यासाठी १५ दगडी पायऱ्या व त्या चारही बाजूने आहेत. अलीकडे येथे संरक्षणात्मक जाळी लावली आहे. गौतम ऋषींनी प्राचीन काळी येथेच गंगेला अडवले होते व तीर्थात पुण्यस्नान केले होते अशी पौराणिक कथा आहे.
धम्मगिरी
एस.एन. गोयंका द्वारा स्थापित, धम्ममागिरी एक ध्यान केंद्र आहे विपश्यना (अंतर्ज्ञान चिंतन) मध्ये भारतातील बुद्ध, 2500 वर्षांपूर्वी शिकवलेल्या तंत्रात अभ्यासक्रम देते. मोठे गोल्डन पॅगोडा, धम्मगिरीचे केंद्रिय थीम इगतपुरीसाठी एक महत्त्वाचे स्थान म्हणून कार्य करते. केंद्र भारत तसेच देशाच्या विविध भागापासून बरेच लोक आकर्षित करते.
रामकुंड
रामकुंड हे नाशिक येथे गोदावरी नदीपात्रात असून मध्यवर्ती बसस्थानकापासून दोन कि.मी. अंतरावर आहे.
वनवासादरम्यान या ठिकाणी प्रभुराम स्नान करीत होते अशी मान्यता असल्याने यास पवित्र समजले जाते. या कुंडा जवळच “अस्थिविलय तीर्थ ” आहे. रामकुंडाचे बांधकाम सातारा जिल्हयातील खटावचे जमिनदार श्री. चित्रराव खटाव यांनी 1696 मध्ये केले. श्री श्रीमंत माधवराव पेशवे (चौथे पेशवे) यांच्या मातोश्री श्रीमती गोपिकाबाई यांनी नंतरच्या काळात रामकुंडाची दुरुस्ती केली. भाविक आपल्या मृत नातेवाइकांच्या अस्थि, अस्थिविलयकुंडात विसर्जित करतात. महात्मा गांधी, पंडीत नेहरु, इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण यांचेसह अनेक महान नेत्यांच्या अस्थि रामकुंड येथे विसर्जित करण्यात आल्या आहेत.
श्री सोमेश्वर मंदीर
हे मंदीर नाशिक मध्यवर्ती बस स्थानकापासुन 8 कि.मी अंतरावर गंगापुर रस्त्यावर आहे. गोदावरी तीरी असलेल्या हया मंदिरात भगवान शिव व हुनुमानाची मुर्ती असुन परिसर वृक्षवेलींनी वेढलेला आहे. दर्शनांनतर नदीत बोटिंग व पोहण्याचा आनंद घेता येतो. सोमेश्वर हे चित्रपटांच्या शुटींगसाठी देखील प्रसिध्द आहे. सोमेश्वरला जातांना “आनंदवल्ली” नावाचा परिसर लागतो. या परिसराचे नांव पेशवे राघोबादादा यांचे पत्नी आनंदीबाई यांचेमुळे ठेवण्यात आले आहे. त्यांचा हया ठिकाणी काही काळ निवास होता. त्यांनी आनंदवल्ली येथे गोदावरी तिरावर नवश्यागणपतीचे आकर्षक मंदिर बांधले आहे.
श्री सप्तश्रृंगी गड
श्री सप्तश्रृंगी गड नाशिक पासुन 60 कि.मी अंतरावर कळवण तालुक्यात स्थित आहे. देवीचे मंदिर 7 शिखरांनी वेढलेले असुन समुद्रसपाटीपासुन 4659 फुट उंचीवर आहे.
यास महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी “अर्ध शक्तीपीठ” मानले जाते. देवीची आठ फुट उंचीची मुर्ती पाषाणात कोरलेली असुन दोन्ही बाजुस 9 असे एकुण 18 हात व त्यात विविध आयुधे असलेली आहे. या ठिकाणी माता भगवती निवास करते. “सप्तश्रृंग” हया शब्दाचा अर्थ “सातशिखरे” असा आहे. गडाच्या पायथ्याशी नांदुरी गाव आहे. गडाच्या शिखरावर विविध औषधी वनस्पती आढळतात. गडावर कालीकुंड, सुर्यकुंड, दत्तात्राय कुंड अशी कुंड आहेत. गडाच्या पुर्वीस खोल दरीने विभागला गेलेला “मार्कंडेय डोंगर” आहे. हया ठिकाणी ऋषी मार्कंडेय यांचे वास्तव्य होते, असे मानले जाते. या ठिकाणी त्यांनी दुर्गासप्तशतीची रचना केली चैत्र व अश्विन नवरात्रात येथे मोठी यात्रा भरते.
सर्व धर्म मंदीर तपोवन
प्रभू रामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या पंचवटीतील तपोवन परिसरात सर्व धर्म मंदिर
सर्वांचे लक्ष वेधून घेते आहे. प्रभू श्री राम, लक्ष्मण आणि सीता यांनी १४ वर्षाच्या वनवासातील
बराचसा काळ या तपोवनात गोदातीरी व्यतीत केला. त्यांच्या जीवनात घडलेल्या काही प्रसंगांचे
दर्शन राम दरबारच्या माध्यमातून या सर्व धर्म मंदिरात होते. तपोवणात जेथे शूर्पणखेचे नाक
कापले होते तेथून हाकेच्या अंतरावर कपिला गोदावरी संगमासमोर हे सर्व धर्म मंदिर असून
येणाऱ्या प्रत्येकाचे आकर्षणाचे केंद्र ठरते आहे. त्यामुळे येथे भाविक आणि पर्यटकांची गर्दी वाढू
लागली आहे. हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई, पारशी होण्याअगोदर आपण सर्व मानव आहोत.
मानवता हाच आपला वास्तविक धर्म असल्याचा संदेश मंदिरातील सर्व धर्माची चिन्ह देतात.
या मंदिरात शूर्पणखेचे नाक कापणे, सीतेचे अपहरण, प्रभू रामचंद्रांना शबरीनी खाऊ घातलेली बोरे,
प्रभू रामांच्या पादुका घेऊन निघालेला प्रिय बंधू भरत यासारखे प्रसंग उभे केले आहेत.
याशिवाय येथे श्री गणेश, दुर्गा, राधा कृष्ण, लक्ष्मी नारायण, विठ्ठल रुक्मिणी, संतश्रेष्ठ माऊली
ज्ञानेश्वर, गुरू नानक देवजी, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, गौतम बुद्ध, महावीर स्वामी,
जगन्नाथ धाम, श्री हंसजी महाराज, माता राज राजेश्वरी देवी यांसह धनुर्धारी श्रीराम आणि
बलशाली रामभक्त हनुमान यांच्या प्रसन्न मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेतात.
मांगी तुगी मंदीर
मांगी तुगी मंदीर नाशिक पासुन 125 कि.मि. अंतरावर सटाणा तालुक्यात आहे. समुद्रसपाटीपासुन 4343 फुट उंचीवर मांगी शिखर तर समुद्र सपाटीपासून 4366 उंचीवर तुंगी शिखर आहे. मांगी तुंगी हे प्रसिध्द धार्मिक स्थळ आहे. मांगी तुंगीच्या पायथ्याशी “भिलवाडी” हे गांव आहे. येथे साधना केल्याणे मोक्ष प्राप्ती मिळते असे मानले जाते.
मांगी
मांगी शिखराची उंची जास्त नसली तरी येथे सराईत गिर्यारोहकच चढु शकतात. शिखराच्या पायथ्याशी भगवान महावीर, अदिनाथ, पार्श्वनाथ, हनुमान, वाली, सुग्रीव इ. यांच्या 356 कोरीव मुर्ती आहेत. गुफांमध्ये देखील काही कोरीव काम आढळते. या ठिकाणी ” मांगीगिरी मंदीर ” आहे.
तुंगी
तुंगी शिखर मांगी शिखरापेक्षा उंच आहे. या शिखराला देखील तुंगी शिखरासारखीच प्रदक्षिणा करता येते. प्रदक्षिणा मार्गावर तीन गुंफा आहे. त्या पैकी एका गुंफेत ” तुंगीगिरी मंदीर ” असून. भगवान बुध्दांच्या 99 कोरीव मुर्ती येथे आहेत.
पांडव लेणी
नाशिकच्या पांडव लेणीही प्रसिध्द आहेत. नाशिक नवीन बसस्थानकापासुन ५ व महामार्ग बसस्थानकापासुन ४ कि.मी. अंतरावर एका मोठ्या टेकडीवर या लेण्या आहेत. ही लेणी मात्र प्राचीन आहेत. सुमारे २५०० वर्षापूर्वीची. येथे जो पाली भाषेतील शिलालेख आहे त्यावरुन ही लेणी २००० वर्षांपूर्वीचीच असल्याचे निश्चित समजले जाते. एकूण २४ लेणी आहेत. काही लेण्या व त्यातील मूर्त्या चांगल्या स्वरुपात तर काही खंडीत स्वरुपात शिल्लक आहेत. बुध्दस्तुप, भिक्षूची निवासस्थाने, बुध्दबोधिसविता, जैन तीर्थकर ऋषभदेवजी, वीर मणिभद्रजी, माता अंबिकादेवी यांच्या मूर्त्या, पाच पांडवसदृशमूर्त्या, भीमाची गदा, कौरव मूर्त्या, इंद्रसभा, देवादिकांच्या मूर्त्या या सर्व लेण्यात आहेत. मूर्त्यांची शिल्पकता वाखाणण्यासारखी आहे.
पंचवटी
नाशिक शहरात पंचवटी परीसर हा गोदावरी नदीच्या डाव्यातीरावर आहे. काळाराम मंदीरा जवळ वटवृक्षांचा समुह असुन हा समुह पाच वटवृक्षांपासून तयार झाला असल्याने या परिसरास’ पंचवटी’ असे म्हटले जाते. ‘पंच’ म्हणजे पाच व ‘वटी’ म्हणजे वडाचे झाड असा अर्थ होतो.
काळाराम मंदिर, कपालेश्वर मंदिर, गंगा-गोदावरी मंदिर, सुंदर नारायण मंदिर, टाळकुटेश्वर मंदिर, निळकंठेश्वर मंदिर, गोराराम मंदिर, मुरलीधर मंदिर, तिळभांडेश्वर मंदिर, बालाजी मंदिर, सांडव्याची देवी मंदिर, विठ्ठलमंदिर, पाताळेश्वर मंदिर, नारोशंकर मंदिर, रामकुंड, दुतोंडया मारुती, कार्तिकस्वामी मंदिर, काटयामारुती मंदीर, पंचमुखी हनुमान मंदिर, भद्रकाली मंदिर, कपुरथळा स्मारक अशी अनेक मंदिरे पंचवटी व सभोवतालच्या परिसरामध्ये गोदावरी नदीच्या दोन्ही तीरांवर आहेत. या मंदिरांमुळेच नाशिकला “पश्चिम भारताची काशी “असे म्हटले जाते.