कॅन्सर सारख्या आजारांना कारणीभुत ठरत असलेल्या चहाच्या कागदी कपावर बंदीचे आदेश निर्गमित करणेबाबत paper tea cup
संदर्भः- सय्यद रफिक पेडगावकर, परभणी जिल्हाध्यक्ष यांचे निवदेन दिनांक २३/१२/२०२४
उपरोक्त संदर्भिय विषयी सय्यद रफिक पेडगावकर, परभणी जिल्हाध्यक्ष यांनी या कार्यालयात निवेदन सादर केले असून, देशासह राज्यात कॅन्सर सारख्या आजाराचे प्रमाण जास्त वाढत आहे या आजाराना कारणीभुत ठरत असलेल्या चहाच्या कागदी कपांवर बंदीचे आदेश निर्गमित करण्यात यावे. परभणी जिल्हयात चहाच्या कागदी कणंचा उपयोग अधिक प्रमाणात केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. ज्याअर्थी चहाचे कागदी कप बनवितांना त्यामध्ये बीपीए नामक केमिकलचा उपयोग केला जातो कागदी कपात गरम चहा टाकल्यावर कपाच्या आतील मायक्रो प्लास्टिकचे कण वितळते व प्लास्टिकचे कण पोटात जातात. त्यामुळे कॅन्सर सारखा आजार होउ शकतो असे नमूद आहे.
सबब, मा. जिल्हाधिकारी यांच्या पृष्ठांकनानुसार कार्यवाही करावी ही विनंती.