बौद्ध पौर्णिमेनिमित्त गौतम बुद्धांचे अनमोल विचार good thought of Gautam Buddha
वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तिथीला बुद्ध पौर्णिमा किंवा वैशाख पौर्णिमा साजरी केली जाते या पौर्णिमेला पिंपळपोर्णिमा असे देखील म्हटले जाते यंदाही पौर्णिमा 23 मे 2024 रोजी साजरी केली जाणार आहे.
धार्मिक मान्यतेनुसार बुद्ध पौर्णिमा ही भगवान बुद्धांच्या जीवनातील तीन महत्त्वाच्या गोष्टींमुळे प्रसिद्ध आहे या दिवशी भगवान बुद्धांचा जन्म भगवान बुद्धांचा ज्ञान प्राप्ती आणि भगवान बुद्धांचे निर्वाण झाले होते भगवान गौतम बुद्धांचा जन्म या दिवशी झाला होता तसेच त्यांना ज्ञान प्राप्ती देखील याच दिवशी झालेली होती.
पुराणांमध्ये असे म्हणतात की भगवान विष्णूचा नववा अवतार म्हणजे गौतम बुद्धांना मानले जाते त्यांचे खरे नाव सिद्धार्थ हे होते त्यांचा जन्म इसवी सन पूर्व 563 मध्ये झाला होता गौतम बुद्धांनी त्यांच्या जीवनात लोकांना अहिंसा आणि करुनीची भावना याची शिकवण दिली त्यांचे अनमोल विचार आजही लोकांमध्ये यश मिळवण्यासाठी कामी येतात लोकांना प्रेरणा देतात जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यामध्ये धैर्य ज्ञान आणि दुःखातून दूर व्हायचे असेल तर भगवान बुद्धांनी जे अनमोल विचार सांगितले आहेत त्याचे आचरण करायला पाहिजे.
भगवान बुद्धांनी सांगितले आहे की आयुष्यामध्ये हजारो लढाई जिंकण्यापेक्षा स्वतःवर विजय मिळवणे केव्हाही चांगले असते जर आपण स्वतःवर नियंत्रण मिळवले तर विजय आपलाच होतो.
पुढे गौतम बुद्ध म्हणतात की जो माणूस जसा विचार करतो तो तसाच बनतो जर आपण वाईट विचार केला किंवा वागलो तर आपण तसेच बनत जातो माणसाने शुद्ध विचाराने बोलले किंवा काम केले पाहिजे ज्यामुळे जीवनामुळे अतिउच्च आनंद मिळतो.
वाईट गोष्टीने वाईट गोष्टी कधी संपत नाही ते संपवण्यासाठी नेहमी मनामध्ये प्रेम आदरभावना असायला पाहिजे जगातील कोणतीही गोष्ट प्रेमाने लवकर जिंकता येते.
भविष्याची स्वप्न बघताना त्यामध्ये अडकू नका त्यावर विचार करायला पाहिजे भूतकाळाची आठवण करून पश्चाताप करण्यापेक्षा वर्तमान मध्ये आनंदी राहायला शिकले पाहिजे.
भगवान गौतम बुद्धांच्या मते जंगली प्राण्याला घाबरण्यापेक्षा कपटी आणि दृष्ट मित्राला घाबरायला पाहिजे जंगली प्राणी शरीराला हानी करतो तर वाईट मित्र तुमच्या बुद्धीला आणि पोहोचू शकतो.
ज्या क्षणापासून तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिकलात त्यावेळी पासून तुम्ही कधीही कोणाला दुखू शकत नाहीत.