9 ऑगस्ट 1946 “ऑगस्ट क्रांती दिन” यावर आधारित सुंदर मराठी 5 निबंध 9th august kranti din 5th marathi nibandh

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

9 ऑगस्ट 1946 “ऑगस्ट क्रांती दिन” यावर आधारित सुंदर मराठी 5 निबंध 9th august kranti din 5th marathi nibandh

9 ऑगस्ट 1946 रोजी ऑगस्ट क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो यावर आधारित सुंदर रीतीने निबंध दिलेले आहेत सदर भाषणे ही शालेय जीवनामध्ये अतिशय उपयुक्त आहेत शाळा स्तरावर तसेच कार्यालयीन स्तरावर निबंध करण्यासाठी अतिशय उपयुक्त असे वेगवेगळ्या स्वरूपात निबंध दिलेली आहेत अतिशय सुंदर लेखन केलेले आहे निबंधातील भाषा उगवती आणि सुटसुटीत स्पष्ट देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

भारताच्या इतिहासात 9 ऑगस्ट हा दिवस ऑगस्ट क्रांती दिन म्हणून ओळखला जातो. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक लहान- मोठ्या चळवळी झाल्या. ब्रिटीशांना भारतातून हाकलून देण्यासाठी महात्मा गांधींनी आपले शेवटचे स्वातंत्र्य युद्ध भारत छोडो चले जावं आंदोलनाच्या रूपात लढण्याची घोषणा केली होती. जी आज ऑगस्ट क्रांती म्हणून इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारताला मुक्त करण्यासाठी ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले त्यांना आठवण्याचा दिवस म्हणजे ९ ऑगस्ट, अर्थात क्रांती दिन !

याच ऑगस्ट क्रांती दिनाची मराठी माहिती आपण आज बघणार आहोत त्याचा फायदा आपल्याला ९ ऑगस्ट क्रांती दिन मराठी मराठी निबंध छोट्या मुलांसाठी तसेच शिक्षकांसाठी लिहिण्यासाठी नक्कीच फायदा होईल. चला तर ऑगस्ट क्रांती दिन निबंधाची सुरूवात करूया !

Kranti din nibandh 2024 : ऑगस्ट क्रांती दिन निबंध : क्रमांक-1

क्रांतीची ज्वलंत धगधगती मशाल हातात घेऊन ब्रिटिश सत्तेच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्या हुतात्म्यांनी आपल्या

प्राणाची पर्वा न करता आहुती दिली, अशा अमर हुतात्म्यांची आठवण तसेच नव्या पिढीला हुतात्म्यांच्या त्यागाची जाणीव रहावी यासाठी दरवर्षी 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिन साजरा केला जातो. 7 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गवालिया टँक दरवर्षी 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिन साजरा केला जातो. 7 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर (क्रांती मैदान) राष्ट्रीय सभेचे अधिवेशन सुरू झाले होते.

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 8 ऑगस्ट रोजी पंडित नेहरूंनी मांडलेला ‘छोडो भारत’ ठराव प्रचंड बहुमताने मंजूर झाला. महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली देशव्यापी अहिंसक आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. महात्मा गांधीजींनी जनतेला ‘करेंगे या मरेंगे’ या भावनेने बलिदानास सिद्ध होण्याचे स्फूर्तिदायक आवाहन केले.

‘चले जाव’ चळवळीला सर्व थरातून पाठिंबा मिळाला. ज्यावेळी ‘चले जाव’ चळवळीचा जोर कमी होत आहे असे ब्रिटिश सरकारला वाटू लागले होते त्याचवेळी भूमिगत चळवळ आकारास येऊ लागली होती. बॉम्ब बनविणे, शस्त्रास्त्रे चालविण्याचे शिक्षण घेणे, गुप्त रेडिओ केंद्रे चालविणे इत्यादी कामे भूमिगत चळवळीतील नेत्यांनी केली.

या चळवळीतील प्रमुख भूमिगत नेते म्हणून जयप्रकाश नारायण,

डॉ. राममनोहर लोहिया, छोटूभाई पुराणिक, अच्युतराव पटवर्धन,या चळवळीतील प्रमुख भूमिगत नेते म्हणून जयप्रकाश नारायण, डॉ. राममनोहर लोहिया, छोटूभाई पुराणिक, अच्युतराव पटवर्धन, अरुणा असफअली, युसूफ मेहेरअली, सुचेता कृपलानी, एस.एम. जोशी, उषा मेहता इत्यादी नेत्यांचा उल्लेख करता येईल. सरकारी यंत्रणेला नुकसान पोहचविणे हे या चळवळीचे मुख्य सूत्र होते.

देशाच्या काही भागांत ब्रिटिश अधिकाऱ्यांची हकालपट्टी करून तेथे लोकाभिमुख सरकारे स्थापन झाली. यालाच प्रतिसरकार असे म्हणतात. बंगालमधील मिदनापूर, उत्तर प्रदेशातील बालिया व आझमगड, बिहारमधील भागलपूर व पूर्णिया या जिल्ह्यांत प्रतिसरकारे स्थापन करण्यात आली.

महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेले प्रतिसरकार विशेष गाजले. कारण दीर्घकाळ अस्तित्वात राहिलेले आणि इंग्रजी सत्तेला शेवटपर्यंत दाद न दिलेले असे हे एकमेव प्रतिसरकार होते. ब्रिटिशांचे नीतीधैर्य खच्ची करण्यात प्रतिसरकारने महत्त्वाचा वाटा उचलला होता.

Kranti din marathi nibandh 2024 : ऑगस्ट क्रांती दिन निबंध : क्रमांक-2

इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारताला मुक्त करण्यासाठी ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले त्यांना आठवण्याचा दिवस म्हणजे 9 ऑगस्ट, अर्थात क्रांती दिन ! स्वातंत्र्यलढय़ाची मशाल पेटवत देशातून इंग्रजी राजवटीला नेस्तनाबूत करण्याची हाक देणाऱ्या तमाम क्रांतिवीरांना अभिवादन करण्याचा हा दिवस,

पण स्वातंत्र्याचा उपभोग घेण्यात दंग असलेल्या आजच्या पिढीसाठी हा दिवस अनोळखी झाला आहे. सर्वाच्या हृदयात क्रांतिवीरांची ती मशाल आठवणीच्या रूपाने धगधगत राहणे अपेक्षित असले तरी ती मशाल केव्हाच विझली आहे. एवढेच काय प्रशासकीय यंत्रणेसाठीही या दिवसाचे महत्त्व आता औपचारिकतेपुरते शिल्लक आहे.

ऑगस्ट क्रांती दिनाला आज 77 वर्ष पूर्ण होत आहेत. 9 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईत भरलेल्या काँग्रेस अधिवेशनात महात्मा गांधींनी केलेली ‘छोडो भारत’ची गर्जना आणि दिलेला ‘करेंगे या मरेंगे’ हा मंत्र ९ ऑगस्टच्या दिवशी संपूर्ण देशात पसरला होता. त्यामुळे यादिवशी क्रांतीची ज्योतच जणू पेटली.

देशभरात ब्रिटिश सत्तेला हाकलून लावण्यासाठी आंदोलनांना सुरुवात झाली. प्रत्येकाला जे योग्य वाटेल ते तो करत होता. ब्रिटिश सत्ता पार हादरून गेली होती. हे रोखायचे कसे असा प्रश्न पडला होता. गांधीजींच्या केलेल्या आवाहनाला संपूर्ण देशातून प्रतिसाद मिळाल्याने ब्रिटिशांची धाबे दणाणले.

चले जाव’ चळवळीने आंदोलनाचे स्वरूप धारण केले. स्वातंत्र्यप्राप्तीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी लक्षावधी भारतीयांनी असीम त्याग केला. अनेकांनी आत्मबलिदान केले. आंदोलकांची संख्याच इतकी प्रचंड होती की, त्यांना डांबून ठेवायला देशातील तुरुंगही अपुरे पडले. साने गुरुजी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज इत्यादींच्या राष्ट्रभक्तीपर गीतांनी आंदोलकांचा उत्साह वाढवला. या राष्ट्रव्यापी आंदोलनाला ‘ऑगस्ट क्रांती’ असेही म्हटले जाते.

Kranti din marathi nibandh 2024 : ऑगस्ट क्रांती दिन nibandh : क्रमांक-3

देशातील आंदोलनाची ब्रिटिशांना आदल्या रात्री बातमी मिळाल्याने पहाटे पाच वाजताच महात्मा गांधी आणि त्यांच्या कुटुंबीयांना बिर्ला हाऊसमधून ताब्यात घेण्यात आले. आता प्रत्येकजण पुढारी होईल, असा संदेश यावेळी गांधीजींनी दिला. ब्रिटिशांनी काँग्रेसच्या सर्व नेत्यांना अधिवेशनाच्या जागीच अटक केली होती.

या सर्व नेते मंडळींना पुण्यात हलवण्यात आले. चिंचवड स्टेशनवर

गाडी थांबवून महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, महादेवभाई देसाई

आणि मीराबेन या चौघांना खाली उतरवण्यात आले आणि त्यांची

रवानगी गुप्त ठिकाणी करण्यात आली.

चले जाव’ चळवळीने आंदोलनाचे स्वरूप धारण केले. स्वातंत्र्यप्राप्तीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी लक्षावधी भारतीयांनी असीम त्याग केला. अनेकांनी आत्मबलिदान केले. आंदोलकांची संख्याच इतकी प्रचंड होती की, त्यांना डांबून ठेवायला देशातील तुरुंगही अपुरे पडले. साने गुरुजी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज इत्यादींच्या राष्ट्रभक्तीपर गीतांनी आंदोलकांचा उत्साह वाढवला. या राष्ट्रव्यापी आंदोलनाला ‘ऑगस्ट क्रांती’ असेही म्हटले जाते.

नेत्यांची धरपकड झाल्याने शांत होईल, अशी अपेक्षा ब्रिटिशांना होती. मात्र घडले भलतेच. नेत्यांच्या अटकेमुळे आंदोलन लोकांच्या ताब्यात गेलं. देशभर जागोजागी आंदोलने, मिरवणुका, मोर्चे यांना ऊत आला. सरकारने जमावबंदी लागू केली. पण लोक आता आदेशांना भीक घालत नव्हते. पोलिसांच्या लाठी हल्ल्याला, गोळीबाराला जुमानत नव्हते. जाळपोळ, पोलिसांचे खून, टेलिफोन व तारा कापणे असे प्रकार सुरू झाले.

देशातील जनतेने ब्रिटिशांविरुद्ध युद्ध पुकारल्याची परिस्थिती होती. संपूर्ण देश पेटून उठला होता. दंगल, जाळपोळ, गोळीबार, रेल्वेचे अपघात, सरकारी कार्यालयांना आगी लावणे, सरकारी खजिन्यांची लुटालूट असे प्रकार सुरू होते. ब्रिटिशांकडून दडपशाही सुरू होती. पाहिजे त्याला विनाचौकशी अटक केली जात होती. सारा देश गोंधळलेल्या स्थितीत होता.

Kranti din marathi nibandh 2024 : ऑगस्ट क्रांती दिन निबंध : क्रमांक-4

‘चले जाव’ चळवळ म्हणजे परकीयांचे झ-जगारून टाकण्यासाठी

भारतीयांनी स्वातंत्र्य मिळविण्याच्या रोखाने उचललेले एक भरभक्कम पाऊल होते. देशासाठी स्वप्राणाची ‘चले जाव’ चळवळ म्हणजे परकीयांचे झू-जुगारून टाकण्यासाठी भारतीयांनी स्वातंत्र्य मिळविण्याच्या रोखाने उचललेले एक भरभक्कम पाऊल होते. देशासाठी स्वप्राणाची बाजी लावण्याची लोकांच्या मनाची तयारी झाली होती.

सरकारने या सर्व प्रकाराला गांधीजींना जबाबदार ठरवले. गांधीजींनी याचा इन्कार केला आणि सरकारच्या निषेधार्थ 21 दिवसांचे उपोषण केले. पण याचवेळी जगभरातील परिस्थितीही बदलत होती. युद्धाचे पारडे दोस्त राष्ट्रांच्या बाजूने झुकत होते. अमेरिका नावाची महासत्ता उदयास येत होती. अमेरिकेच्या मदतीने ब्रिटिशांनी मुसंडी मारली. त्यामुळे दुस-या महायुद्धात दोस्त राष्ट्रांचा विजय झाला.

महायुद्धाच्या आघाडीवर दिलासा मिळाल्याने ब्रिटिशांनी सर्व यंत्रणा भारतातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वापरली आणि क्रांतीची तीव्रता हळूहळू कमी झाली. भारतावर दीडशे वर्षे राज्य करणा-या इंग्रजांना देशातून हुसकावून लावण्यासाठी ९ ऑगस्ट १९४२ रोजी क्रांतीची ठिणगी पडली होती.

या लढ्यात गोंदिया जिल्ह्यातील काही लोकांनी हौतात्म्य पत्करले. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी त्या क्रांती लढ्याची आठवण म्हणून ९ ऑगस्टला ‘क्रांती दिन’ पाळला जातो; परंतु आज या दिवसाचे महत्त्व नवीन पिढीलाच नाही, तर नेते-पुढाऱ्यांनाही राहिलेले नाही, हे आपले दुर्दैव आहे.

भारतीय जनता आपल्या विरोधात गेली आपण भारत देशावर फार काळ राज्य करू शकणार नाही याची जाणीव ब्रिटिशांना झाली. आपल्या भारत देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या सर्व अमर हुतात्म्यांना माझे कोटी-कोटी प्रणाम ! जय हिंद !

Kranti din marathi nibandh 2024 : ऑगस्ट क्रांती दिन निबंध: क्रमांक-5

देशभरात ब्रिटिश सत्तेला हाकलून लावण्यासाठी आंदोलनांना सुरुवात झाली. प्रत्येकाला जे योग्य वाटेल ते तो करत होता. ब्रिटिश सत्ता पार हादरून गेली होती. हे रोखायचे कसे असा प्रश्न पडला होता. गांधीजींच्या केलेल्या आवाहनाला संपूर्ण देशातून प्रतिसाद मिळाल्याने ब्रिटिशांचे धाबे दणाणले.

देशातील आंदोलनाची ब्रिटिशांना आदल्या रात्री बातमी मिळाल्याने पहाटे पाच वाजताच महात्मा गांधी आणि त्यांच्या कुटुंबीयांना बिर्ला हाऊसमधून ताब्यात घेण्यात आले. आता प्रत्येकजण पुढारी होईल, असा संदेश यावेळी गांधीजींनी दिला. ब्रिटिशांनी काँग्रेसच्या सर्व नेत्यांना अधिवेशनाच्या जागीच अटक केली होती.

चले जाव’ चळवळीने आंदोलनाचे स्वरूप धारण केले. स्वातंत्र्यप्राप्तीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी लक्षावधी भारतीयांनी असीम त्याग केला. अनेकांनी आत्मबलिदान केले. आंदोलकांची संख्याच इतकी प्रचंड होती की, त्यांना डांबून ठेवायला देशातील तुरुंगही अपुरे पडले. साने गुरुजी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज इत्यादींच्या राष्ट्रभक्तीपर गीतांनी आंदोलकांचा उत्साह वाढवला. या राष्ट्रव्यापी आंदोलनाला ‘ऑगस्ट क्रांती’ असेही म्हटले जाते.

सरकारने या सर्व प्रकाराला गांधीजींना जबाबदार ठरवले.

गांधीजींनी याचा इन्कार केला आणि सरकारच्या निषेधार्थ 21 गांधीजींनी याचा इन्कार केला आणि सरकारच्या निषेधार्थ 21 दिवसांचे उपोषण केले. पण याचवेळी जगभरातील परिस्थितीही बदलत होती. युद्धाचे पारडे दोस्त राष्ट्रांच्या बाजूने झुकत होते. अमेरिका नावाची महासत्ता उदयास येत होती. अमेरिकेच्या मदतीने ब्रिटिशांनी मुसंडी मारली. त्यामुळे दुस-या महायुद्धात दोस्त राष्ट्रांचा विजय झाला.

या सर्व नेते मंडळींना पुण्यात हलवण्यात आले. चिंचवड स्टेशनवर गाडी थांबवून महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, महादेवभाई देसाई आणि मीराबेन या चौघांना खाली उतरवण्यात आले आणि त्यांची रवानगी गुप्त ठिकाणी करण्यात आली.

मात्र ब्रिटिश सरकारने गुप्तता पाळूनही या घटनेची माहिती वाऱ्याच्या वेगाने पसरली. गांधीजींना पुण्यातील आगाखान पॅलेसमध्ये आणि नेहरू, पटेल, आझाद यांना अहमदनगरच्या

किल्ल्यात ठेवण्यात आल्याची माहिती पसरली. या लढ्यात गोंदिया जिल्ह्यातील काही लोकांनी हौतात्म्य पत्करले. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी त्या क्रांती लढ्याची आठवण म्हणून ९ ऑगस्टला ‘क्रांती दिन’ पाळला जातो; परंतु आज या दिवसाचे महत्त्व नवीन पिढीलाच नाही, तर नेते-पुढाऱ्यांनाही राहिलेले नाही, हे आपले दुर्दैव आहे.

Leave a Comment