शिवजयंती निमित्त जबरदस्त सूत्रसंचालन चारोळ्यांसह सुंदर सूत्रसंचालन pdf उपलब्ध shivjayanti sutrasanchalan pdf 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शिवजयंती निमित्त जबरदस्त सूत्रसंचालन चारोळ्यांसह सुंदर सूत्रसंचालन pdf उपलब्ध shivjayanti sutrasanchalan pdf 

सुस्वागतम…..सुस्वागतम…. सुस्वागतम ….!!

स्वराज्याला पहिल्या छत्रपतींच्या रूपाने अनमोल रत्न प्रदान करणाऱ्या जिजाऊ माँसाहेबांना वंदन, स्मरण व त्रिवार मनाचा मुजरा करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने उपस्थित सर्व मान्यवरांचे मी श्री. सौ.

स्नेहपूर्वक स्वागत करतो । करते. व शिवजयंतीच्या कार्यक्रमास मी सुरुवात करतो / करते.

छत्रपती शिवराय म्हणजेच राजासारखे मन असलेले रयतेच्या मनासारखे राजे होय.

शिवराय म्हणजेच सळसळत्या रक्तात वाहणारा अखंड शौर्याचा स्त्रोत. शिवबा, रयतेचे राजे, जाणता राजा हे शब्द आज साडेतीनशे वर्षानंतरही कानी पडताच उर अभिमानाने फुलून येतो व देही स्फुरण चढल्याशिवाय राहत नाही. अशा एका झंझावाती वादळाची व रयतेच्या कल्याणकारी राजांची म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांची आज वी जयंती.

अध्यक्षीय निवड :

एखादयाचं येणं म्हणजे नुसतं येणं नसतं तर ते काळजात कोरलेलं आभाळभर लेणं असतं, याच रुपानं आपल्या कार्याचे बीज पेरणारे व सतत आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे / राहणाऱ्या श्री. / सौ. …………यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्विकारावे अशी मी त्यांना विनंती करतो / करते.

( सहकारी शिक्षक / शिक्षिकेने अध्यक्षीय विनंतीस अनुमोदन दयावे)

दीपप्रज्वलन / प्रतिमा पूजन :

कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे व व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी स्नेहपूर्वक विनंती करतो । करते की त्यांनी त्यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करावे व अज्ञानाच्या बंदिस्त कवाडांना ज्ञानरूपी प्रकाश देवून अज्ञानास दूर सारावे.

सुमंगल वातावरणात समईच्या उजळल्या वाती

मान्यवरांनी शुभहस्ते प्रज्वलीत कराव्या ज्ञानज्योती

( शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करतांना खालील ओळी वापरू शकतात….)

किती आले किती गेले कैले मुघलांना हद्दपार राजे बहु धरतीवरती ना कुणा शिवबांची सर सह्याद्रीच्या रांगांवरती सदा मुघलांच्या नजरा बोटे छाटीली तयांची त्या शिवबांना माझा मुजरा सदा गायी तुझे गुणगान असा माझ्या पोटी वंश दे फक्त तुझ्या…. फक्त तुझ्याच शिवशौर्याचा ” तू अंश दे

मान्यवर परिचय व स्वागत :

( व्यासपिठावरील मान्यवरांचा त्यांच्या कार्यकर्तृत्वानुसार परिचय करून देण्यात यावा. )

अध्यक्ष श्री सौ._____________________________

________________________________________

प्रमुख पाहुणे : श्री. सौ.______________________

_______________________________________

अतिथींच्या आगमनाने झाले

वातावरण प्रसन्न उल्हासित

करुनी उपकृत आम्हा

स्विकारावे आमुचे स्वागत

( पुस्तक स्वरूपात / झाडाचे रोप देऊन यथोचित स्वरुपात स्वागतनियोजन करून ठेवावे.)

_______________________________________

_______________________________________

_______________________________________

प्रास्ताविक :

सुख दुःखाच्या छायेतून कळते

जसे सार अवघ्या जीवनाचे

आत्मा कार्यक्रमाचा दर्शविते

तसे हे महत्व प्रास्ताविकाचे

व्यासपिठावरील सन्माननीय अध्यक्ष, मान्यवर व विद्यार्थीमित्रांनो….

सांगा काय बोलावे पामराने

शिवबांच्या शिवशौर्याप्रती

जगती शोभुनी दिसे राजा

अवघ्या जगाचा छत्रपती

न्यायदानाची त्यांची

असे तहाच निराळी

लेणे सौभाग्याचे शाबूत

असे शिवशौर्यामुळे भाळी

मायमाऊलीच्या स्त्रीत्वाचा

केला सदैव सन्मान

यमसदनी धाडुनी हैवानांना

राखीली स्वराज्याची शान

युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती परंपरेनुसार वैशाख शुद्ध द्वितीयेस साजरी होते. छत्रपती शिवाजी महाराज हे असे महापुरुष होऊन गेले की, साडेतीनशे वर्षे झाली तरीही त्यांचे कार्य, पराक्रम आणि विचार यांची प्रेरणा अजूनही ताजी आहे. आजही आपण त्यांच्या काळासंदर्भात त्यांच्या स्वराज्य निर्मितीचा विचार करायला लागतो तेव्हा त्यांनी किती प्रतिकूल स्थितीत हे सतीचे वाण आपल्या हाती घेतले होते याचा अचंबा वाटतो. शिवाजी महाराज त्या प्रदेशात रहात होते तो प्रदेश आदिलशहाच्या अधिपत्याखाली होता आणि त्या मध्ययुगीन राजवटींमध्ये सुलतानांच्या विरोधात बंड करणे म्हणजे प्राणाशी गाठच असायची. डोळे फोडणे, मालमत्तेची राखरांगोळी करून जबर दंड बसवणे, कुटुंबांसह जाळून हत्या करणे, तोफेच्या तोंडी देणे, कडेलोट करणे, हत्तीच्या पायाखाली चिरडून मारणे किंवा घोड्यांच्या पायांना बांधून फरपटत नेणे अशा अमानुष शिक्षा दिल्या जात असत. अशा शिक्षा भोगण्यापेक्षा त्या सुलतानांच्या पायाशी शरण जाणे परवडेल अशी मानसिकता समाजता होती, पण शिवाजी महाराजांनी अशाही स्थितीत परकियांची राजवट उलथून टाकून स्वतःचे राज्य निर्माण करण्याचा पण केला. हे त्यांचे महान कार्य आजही आपल्याला प्रेरणा देत असते.

एकदा असे साहस करण्याचा निर्धार केल्यावर कितीही संकटे आली तरीही आपल्या ध्येयापासून विचलित न होण्याचा त्यांचा गुणही असामान्यच होता. राजेच निश्चयापासून ढळले असते तर सारे सहकारीही बिथरले असते. म्हणून खंबीरपणे उभे राहून महाराजांनी केवळ अडचणींना तोंडच दिले असे नाही तर त्या अडचणींतून मोठ्या कुशलतेने मार्गही काढला.

महाराजांनी आपल्या सवंगड्यात स्वराज्य स्थापनेचा ध्येयवाद इतका पक्का रुजवला होता की, त्या ध्येयवादाच्या मार्गातून त्यांचे सहकारी कधीही ढळले नाहीत. शिवाजी महाराजांचे काही आप्तच त्यांचा विरोधात होते. अशावेळी त्यांना निष्ठा वाहिलेल्या कोणीही, महाराजांचे आप्तच स्वराज्याच्या विरोधात आहेत मग आपणच स्वराज्यापायी आपल्या संसाराची वाताहत कशाला करून घ्यायची असा विपरीत विचार केला नाही. त्यांनी आपली निष्ठा महाराजांना वाहिली.

शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले हाच केवळ त्यंचा मोठेपणा आहे असे नाही, तर त्यांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केले आणि अक्षरशः मूठभर सहकाऱ्यांच्या मदतीने ते इतिहासदत्त कार्य केले. असे करण्यासाठी लागणारी धीरोदत्त वृत्ती. संकटाशी मुकाबला करण्यासाठी करावे लागणारे बिनचूक नियोजन आणि त्या नियोजनप्रमाणे काम पार पाडण्यासाठी आवश्यक असलेले व्यवस्थापन हे गुण त्यांच्या ठायी होते म्हणूनच हे शक्य झाले. त्यांच्या अंगी असलेल्या या गुणांचा अभ्यास, विश्लेषण आणि अनुकरण करणे आजही आवश्यक आहे.

मध्ययुगामध्ये अनेक राजे, महाराजे आणि सुलतान होऊन गेले. त्या प्रत्येकाशी तुलना केली तर शिवाजी महाराजांचे स्वराज्य विस्ताराने फारसे मोठे नव्हते. परंतु त्यांच्या समकालीन असलेल्या कोणत्याही सुलतानापेक्षा किंवा शहापेक्षा शिवाजी महाराजांचे पोवाडे जास्त गायिले जातात. त्याचे सर्वात मोठे कारण होते शिवाजी महाराजांची प्रजाहितदक्षता. आपल्या राज्यामध्ये प्रजेला कसलाही त्रास होता कामा नये याबाबत महाराज कमालीचे दक्ष होते. त्यामुळे त्यावेळच्या प्रजेला स्वराज्य आपले आहे असे वाटत असे. अन्य राजवटीच्या बाबतीत असे घडलेले नव्हते, हे महाराजांचे वैशिष्ट होते. त्याकळेचे जहागीरदार, वतनदार प्रजेला पिळून स्वतः ऐटित राहत असत आणि सामान्य माणांसावर अनेक प्रकारचे अत्याचार करत असत. परंतु प्रजेवर पुत्रवत प्रेम करणारे शिवाजी महाराज हे त्या काळात एक आगळेवेगळे राजे म्हणून जाणले जात. प्रजेला सवलती देणारा राजा ही संकल्पनाच त्या मध्ययुगामध्ये क्रांतीकारक ठरलेली होती. म्हणूनच शिवाजी महाराजांविषयी असे म्हटले जाते की, राजे तर अनेक होऊन गेले, पण त्यातल्या कोणत्याही राजाला प्रजेने देवाचा अवतार मानलेले नव्हते. शिवाजी महाराजांना मात्र जनतेने देवाचा अवतार मानलेले होते.

शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने रयतेच्या या कल्याणकारी राजांना कोटी कोटी वंदन करून माझ्या प्रस्ताविकास मी येथे पूर्णविराम देतो.

विद्यार्थी व शिक्षक भाषणे :

(प्रास्ताविक वाचनानंतर क्रमवार विदयार्थी व शिक्षक यांची भाषणे घ्यावीत.)

____________________________________

____________________________________

____________________________________

____________________________________

अध्यक्षीय / मान्यवर भाषणे :

तेज तुमचे आहे, सुर्य-चंद्राहूनही जास्त

तुमच्या या बोलण्याच्या शब्दातच आहे,

जीवनाचे संपूर्ण शास्त्र

ज्ञानरूपी मार्गाच्या पदक्रमातून,

कळस गाठू प्रगतीचा त्यासाठी

मान आहे अध्यक्षीय मार्गदर्शनाचा

विदयार्थ्यांच्या यशप्राप्तीसाठी यथायोग्य मार्गदर्शन आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. / सौ. यांनी करून त्यांच्या ज्ञानकुंभातील काही मार्गदर्शनपर मौलिक विचार आमच्या विदयार्थ्यांसमोर मांडावेत जेणेकरून त्यांचे अनमोल व प्रेरक विचार विदयार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यातील प्रगतीसाठी मार्गदर्शक ठरतील.

मी त्यांना विनंती करतो / करते कि त्यांनी आपले बहुमोल मार्गदर्शनपर विचार विदयार्थ्यांसमोर मांडावेत …..  !!

• आभार प्रदर्शन :

माझे सहकारी शिक्षक / शिक्षिका श्री. सौ._______________यांनी आभार प्रदर्शन करावे अशी मी त्यांना विनंती करतो / करते.

व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी वेळात वेळ काढून आपला बहुमूल्य वेळ देऊन व विदयार्थ्यांप्रती अनमोल मार्गदर्शन केल्याबद्दल मी विदयालयाच्यावतीने आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो व आपले असेच मार्गदर्शन सदैव आम्हाला लाभेल अशी अपेक्षा व्यक्त करतो.

ज्ञानकुंभ रिता करुनी अनमोल,प्रेरक ज्ञान दिले

बोधामृत पाजूनी ज्ञानाचे आम्हा उपकृत केले

तुम्ही पाठीराखे आमुचे सदा तुमचाच आधार

मार्गदर्शन असू दयावे नित्य स्विकारुनी हे आभार

आपण केलेल्या मार्गदर्शनाचा प्रेरक विचारांचा व अनुभवाचा फायदा आमच्या विदयार्थ्यांना नक्कीच होईल व त्यांची सर्वांगीण समाज व राष्ट्रहितावह अशीच प्रगती साधली जाईल याची आम्हाला निशंक खात्री आहे. तसेच आजच्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी ज्यांनी परिश्रम घेतले व प्रत्यक्ष / अप्रत्यक्षरित्या ज्यांचे सहकार्य लाभले त्या सर्वांचे आभार मानने देखील याप्रसंगी क्रमप्राप्त ठरते.

थेंबाथेंबाने तलाव भरतो

हाताहाताने कार्यक्रम फुलतो

जेथे जेथे आहेत या कार्यक्रमाचे शिल्पकार

तेंव्हा मानलेच पाहिजेत त्यांचेही आभार

समारोप :

आतिथींच्या येण्याने कार्यक्रमाला शोभा आली

आपल्या मार्गदशर्नाने

आम्हाला दिशा मिळाली

शेवटी आता समारोपाची वेळ आली

अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम इथे संपला असे मी जाहीर करतो / करते.

!! जय हिंद -जय भारत – जय महाराष्ट्र !!

 

Join Now