निपुण भारत गुणवत्ता वृद्धी कार्यक्रम-भाषा स्तर nipun gunvatta vadh programme
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सन २०२० नुसार, प्राथमिक स्तरावर सन २०२६-२७ पर्यंत मुलभूत भाषिक व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे.
यात प्राथमिक पातळीवरील अनेक विद्यार्थ्यांनी अद्याप मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त केले नाही, असे ठळकपणे नमूद आहे. वय वर्षे ३ ते ९ वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांना मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त करण्यासाठी त्वरीत एक राष्ट्रीय अभियान राबवून त्याची राज्यामध्ये अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. सदर अभियानात विद्यार्थी, पालक, शाळा, शिक्षक व समाज या सर्वांनी सर्वंकष पुढाकार घेऊन राज्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या भावी शिक्षणाचा पाया मजबूत करणे गरजेचे आहे. त्यासाठी भारत सरकारने “समग्र शिक्षा” मध्ये निपुण भारत (National Initiative For
👉👉निपुण भारत गुणवत्ता वृद्धी कार्यक्रम-भाषा स्तर pdf download
👉👉निपुण भारत गुणवत्ता वृद्धी कार्यक्रम-गणित स्तर pdf download
Proficiency In Reading With Understanding and Numeracy) अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्ता ३ री पर्यंत मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान सन २०२६-२७ पर्यंत प्राप्त करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. याकरिता कृती आराखडा तयार करणे, विषयसूची व प्राधान्यक्रम ठरविण्याची गरज आहे. यासाठी जिज्ञासूपणास वाव देणारा अभ्यासक्रम व शैक्षणिक साहित्य (ऑफलाईन व ऑनलाईन), निश्चित क्षमता विधाने (Learning Competencies) व अध्ययन निष्पत्ती (Learning Outcomes), शिक्षक सक्षमीकरण, मूल्यमापनाची तंत्रे इत्यादी विकसित करणे आवश्यक आहे.
हे ही वाचा
👉👉पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान (FLN) निपुण महाराष्ट्र कार्यक्रम
👉👉सन २०२४-२५ यु-डायस प्लस प्रणालीमध्ये माहिती भरण्याच्या अनुषंगाने कार्यशाळा आयोजित करणेबाबत
👉👉मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान टप्पा-२ नाविन वेळापत्रक
👉👉शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील प्राथमिक शाळांना जयंती पुण्यतिथी व सुट्ट्यांची यादी
👉👉विद्यांजली पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी अधिकृत रजिस्ट्रेशन लिंक येथे
👉👉“शिक्षण सेवा पंधरवडा अभियान” राबविणेबाबत
👉👉राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार-२०२४ राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार
सध्या इयत्ता ४ थी व ५ वी मधील ज्या विद्यार्थ्यांनी मुलभूत कौशल्ये प्राप्त केली नाहीत, त्यानांही आवश्यक नैपुण्य प्राप्त करण्यासाठी वैयक्तिक मार्गदर्शन, समवयस्क विद्यार्थ्यांसोबत गटकार्य व वयानुरूप पूरक अध्ययन साहित्य (छापील व डिजिटल स्वरूपात) उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.