दुर्गा देवीच्या मंडपात शपथ घेऊन सांगतो मराठ्यांना टिकणारे आरक्षण देणारच – मा.मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे mukhyamantryancha shapath nama

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
mukhyamantryancha shapath nama
mukhyamantryancha shapath nama

दुर्गा देवीच्या मंडपात शपथ घेऊन सांगतो मराठ्यांना टिकणारे आरक्षण देणारच – मा.मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांची पत्रकर परिषदेत घोषणा mukhyamantryancha shapath nama

 

मराठा आक्षणासाठी दिलेली वेळ 24 तारखेला संपत असल्यामुळे 25 तारखे पासून पुन्हा उपोषणासाठी बसत असल्याचा इशारा मराठा योद्धा श्री. मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. केवळ आंतरवलीच नाही तर राज्यातील प्रत्येक सर्कल मध्ये तसेच गावागावात उपोषण होणार आहे तसेच दिनांक 28 ऑक्टोबर पासून कडक उपोषण केले जाणार आहे आमदार खासदार नेते मंडळी यांना गावात किंवा कोणत्याही कार्यक्रमात येऊ दिले जाणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत मराठा समाजाला आव्हान केले आहे की कोणीही टोकाचं उपोषण करू नये आत्महत्या करु नका मी आरक्षण मिळून देणारच मराठ्यांना टिकणारे आरक्षण मिळून देणार आशी घोषणा मुख्यंमत्र्यांनी केली आहे

 

मनोज जरांगे यांनी त्यांच्या आजच्या सभेमध्ये त्यांची पुढची भूमिका स्पष्ट केली आहे. तर मराठा आरक्षणासाठी काही दिवसांपासून आत्महत्येचा घटना देखील समोर येत आहेत. या सर्व गोष्टींवर मुख्यमंत्री शिंदे यांनी भाष्य केलं आहे.

 

टोकाचं पाऊल उचलू नका – मुख्यमंत्री शिंदे

 

आरक्षण देण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं. मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. मी दिलेला शब्द पाळणारच.अतिशय संवदेनशील घटना घडतायत. त्यामुळे कुणीही टोकाचं पाऊल उचलू नये, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

Mukhyamantryancha shapath nama
Mukhyamantryancha shapath nama

आरक्षणाच्या आशा सर्वोच्च न्यायालायात पुन्हा पल्लवित

 

‘जे आर्थिक घटकांमधून आरक्षण दिलं होतं ते उच्च न्यायायलयात टिकलं पण सर्वोच्च न्यायालायामध्ये ते आंदोलन टिकू शकलं नाही. पण आता क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालायाने दाखल करुन घेतली. त्यामध्ये मराठा आरक्षण प्रकरणात लक्ष घालणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने देखील म्हटलं. मागील वेळेस ज्या गोष्टी सुप्रीम कोर्टात मांडता आल्या नाहीत त्या सर्व बाबी यावेळी मांडण्यात येतील’, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

 

आरक्षण देण्याची जबाबदारी आमची – मुख्यमंत्री शिंदे

 

कुणबी प्रमाणपत्रावर युद्धपातळीवर काम सुरु असल्याचं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगितलं. यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की,  ‘ज्याप्रमाणे सरकाराने शब्द दिला आहे त्याचप्रमाणे या मुद्द्यावर काम सुरुये. आपल्या मराठा समाजातील तरुणांचा जीव इतका स्वस्त नाही. म्हणून या तरुणांनी त्यांच्या घरच्यांचा विचार करायला हवा. मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी ही आमची आहे. त्यानुसार आम्ही मराठा समाजाला जास्तीत जास्त लाभ देण्याचे प्रयत्न करत आहोत. ‘

 

आम्ही मराठा समाजाच्या बाजूनेच

 

‘दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मी आम्ही मराठा समाजाच्या बाजूनेच आहोत.  मी कोणतीही खोटी आश्वासनं देत नाही. त्यामुळे सरकार हे मराठा समाजाच्या बाजूने आहे. इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता कायद्याच्या चौकटीत बसणारं आणि टिकणारं आरक्षण हे मराठा समाजाला मिळेल’, असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

 

सध्या राज्यात मराठा आरक्षणचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. त्यातच मराठ्यांना आरक्षण मिळणारच असा शब्द यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलाय. तर दुसरीकडे मनोज जरांगे यांनी अल्टिमेटम संपल्यानंतर आमरण उपोषणची हाक दिलीये. यामध्ये आता सरकार कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

Leave a Comment