जालना जिल्ह्यातील मराठा समाज बांधवांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेणेबाबत शासनाचे आदेश maratha aarakshan
महाराष्ट्र शासन, गृह विभाग क्रमांक पीआरओ -०१२४/प्र.क्र.१३/विशा-२, दि.०१/०२/२०२४ चे पत्राची प्रत सह पत्रासह सोबत जोडली आहे.
महाराष्ट्र शासनाचे पत्र येथे पहा 👉👉pdf download
२ उपरोक्त पत्रान्वये मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी श्री जरांगे पाटील यांनी मोजे अंतरवाली सराटी, तालुका अंबड, जिल्हा जालना येथे आमरण उपोषण सुरु केले होते, या उपोषणादरम्यान सप्टेंबर महिन्यात अनुचित प्रकार घडल्यामुळे मराठा आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच सदर घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यात इतर ठिकाणीही आंदोलनकत्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत.
३. तरी, पोलीस आयुक्त व अधीक्षक यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी याअनुषंगाने सदर घटनेच्या पार्श्वभूमीवर जालना येथे तसेच राज्यात इतर ठिकाणी मराठा आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांची सोबत जोडलेल्या विवरणपत्रातील मुद्यांबाबतची माहिती उलटटपाली या कार्यासनाचे ई-मेल-desk 20.goffice@mahapolice.gov.in वर PDF Format मध्ये पाठवावी